Pages

Tuesday 26 July, 2011

भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात नागरी अणुऊर्जा सहकार्य करार

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील दक्षिण कोरिया आणि मंगोलिया या दोन देशांच्या दौऱ्‍यावर असून भारत व दक्षिण कोरिया यांच्यात दि. २५ जुलै २०११ रोजी
नागरी अणुऊर्जा सहकार्य करार करण्यात आला असून यामुळे भारतातील
अणुऊर्जा प्रकल्पाच्या बांधणीमध्ये
सहभागी होण्याचा द. कोरियाचा मार्ग
मोकळा झाला आहे.

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि द.कोरियाचे ली म्युँग बंक यांच्यातील
चर्चेनंतर हा करार करण्यात आला.
२००८ मध्ये अणू पुरवठादार गटाने
दिलेल्या संमतीनंतर द.
कोरियाला भारताशी हा करार करता आला.
या गटामध्ये अमेरिका, फ्रान्स, रशिया,
कॅनडा, मंगोलिया, कझाकस्तान,
अर्जेटिना व नामिबिया यांचा समावेश
आहे.
दक्षिण कोरिया सध्या २०
अणुऊर्जा प्रकल्प चालवित असून
त्याद्वारे त्यांच्या विजेच्या ३५
टक्के गरजा पूर्ण
करण्यासाठी ऊर्जा निर्मिती केली जात
आहे.

यामुळे द. कोरिया हा भारतातील अणुऊर्जा विकासकामातील नववा सहकारी देश बनला आहे.

No comments:

Post a Comment